बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

“टिम लक लक ते टिम लक”




आज खूप दिवसांनी ‘रंग दे बसंती’ ची आठवण आली. त्यातला DJ आठवला. “ कॉलेज के गेट के ये तरफ हम जिंदगी को नाचते है तो दुजी तरफ जिंदगी हमे नचाती है.”
आजूबाजूला बघताना सारखा हा dialogue आठवतो. काय लिहिलंय! एका dialogue मधे आयुष्य मांडल्यासारखा वाटतं.

खरंय का हे? प्रश्न पडायला लागतो मला. आपलं पण जगणं ह्याच philosophy ने व्हायला लागलंय का? काय बदलतंय आजूबाजूचं? रोजचा तोच तोचपणा आहेच आयुष्यात. पण आतला एक आवाज आता life च्या तालावर नाचायला नाही म्हणतोय.

आताशा त्या टिम लक लक चा त्रास व्हायला लागलाय. तो ताल आता स्वतःविषयीचा चोतेपणा वाढीस लावायला लागलाय. नाही नाचायचं ह्या तालावर. प्रश्न खूप वाढत चाललेत. पण आता प्रश्न पण धूसर होत चाललेत. ह्या प्रश्नांची उत्तरं आता तो तालच द्यायला लागला आहे. ह्या तालाला पर्याय स[अडत नाहीये. कुठे चाललोय मी? हा ताल मला स्वतःमध्येच खेचत चालला आहे. एका मोठ्या empty space मध्ये.

इथे पण खूप लोक आहेत, आज पण खूप फोन येतात, रात्री अपरात्री मेसेज येतात, उशीरा घरी येणं अजूनही थांबलं नाहीये. हे सगळं कोणत्या तरी जुन्या दिवसांसारखा वाटतंय. पण फरक आहेच. रात्रीच्या फोन आणि मेसेज मध्ये काहीच भावना नाहीयेत. उशिरा घरी यायला तिकडे थांबायचं काहीच कारण नाहीये. लवकर घरी पोहोचावस वाटतं आता. ह्या आजूबाजूच्या गर्दीत आपला असा एकही चेहरा सापडत नाहीये.

त्या दिवसांची आठवण येऊन मी सारखा सारखा त्या कट्ट्यांवर जातो. त्या कट्ट्यावरची लोकं पण आता बदललीयेत. ओळखीचा असा एक पण चेहरा दिसत नाहीये इथे. कुठे गेलेत सगळे? काय करतायेत? कुठे होतो आपण? कॉलेजचा परिसर पुन्हा आठवायला लागलाय. ‘टिम लक लक ते टिम लक’ ह्या तालावरच दुसरा पण दिवस सुरु होतो, अगदी पहिल्यासारखा. आज पण कांचे फोन करण्यात आणि घेण्यात busy नेहेमीप्रमाणे.

पण मग एक फोन येतो. समोरून चार शिव्या ऐकायला मिळतात. ताल विरत चाललाय हळू हळू. संध्याकाळी हा अजून चार जणांना गोळा करतो. एकमेकांवर शिव्यांचा पाउस पडतो. ताल वाजायचा पूर्ण थथांबलाय. ती एक संध्याकाळ पुढचे काही दिवस मनात आणि मनात एकाच भावना “ DJ माझा एक मित्र पण तुझ्या theory ला हरवायला पुरेसा आहे.”

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

वळणं

वळणं

काहीच सुचेनासं झालंय आताशा. लिहिण्याचं एक spirit मरून गेलय, किंबहुना मारलं जातंय, सगळ्यांकडून आजूबाजूच्या. एक लेखक आतल्या आत घुसमटतो आहे. लिहिण्यासाठी. आणि आता लेखणी पण साथ देईनाशी झालीये.
हा लेखक कोणी मोठा किंवा established माणूस नाहीये. प्रयत्न करतोय तो हळू हळू; शिकण्याचा, observe करण्याचा. पण आता तू शिकण पण विसरून गेलाय. आता त्याला समोरचे आकडे दिसतात फक्त, शब्द पार दुरावले आहेत त्याच्यापासून. आता त्याला फक्त industry ला observe करता येतं, कला केव्हाच लांब निघून गेलीये. आता तो पण जगण्याच्या स्पर्धेत उतरलाय आणि नुसता पळत सुटलाय. कुठे पळत चाललाय त्याला पण माहिती नाहीये.
आधी पण सवय होती त्याला ह्या पळण्याची. पण तेव्हा तो पाळण्यातून सवड काढायचा. रेस विसरून जायचा. बरोबरीचे पार पुढे निघून जायचे आणि तो फक्त हसून त्यांना टाटा करायचा. कारण त्याला त्या rat race मध्ये नुसतच पळायचं नव्हत. थोडीशी उसंत काढून त्या झाडाखाली बसलं कि आपोआप हातात पेन यायचं आणि मग मागोमाग शब्दांना पळावयाचा तो. ह्या शब्दांना शोधायची गरज नव्हती पडली त्याला कधी. ते आपले स्वतःहून मुकाट्याने यायचे. पण आता कोण जाणो काय झालं होतं? शब्द हरवले होते आयुष्यातून त्याच्या. त्या शब्दांना शोधण्यासाठी पण थांबू शकत नव्हता तो.
पूर्वी असा एकटा नव्हता पडला तो. आजूबाजूला सतत चार लोक असायची. खरी नसली तरी त्याच्या हक्काची माणस होती ती. त्यांच्या तोंडून तो वाटेल ते बोलून घ्यायचा. त्याला वाटेल तसा आयुष्य फिरवायचा तो. आणि मग कंटाळा आला कि नवीन लोकांना सोबतीला घ्यायचा तो. आता मात्र त्याची अवस्था त्यांच्यासारखी झाली होती. त्याचा आयुष्य आता दुसरे वाटेल तसं फिरवत होते. त्यांना हवं तेच बोलत होता तो. आणि दुसरीकडे पळणं मात्र चालूच होतं.
आजूबाजूला अनेक लोकं पळत होती त्याच्या. त्याला मधूनच या पळण्याचा कंटाळा यायचा. पण जगाची एक अदृश्य शक्ती त्याला पळवत होती त्या सगळ्यांबरोबर. नाती, जबाबदार्या, बंधनं ढकलत चालले होते त्याला ह्या पळण्यात. त्याला दमायला पण परवानगी नव्हती. थांबायला तर नव्हतीच नव्हती. थांबला तर संपला असता ना तो.
पण पळता पळता त्याला कधीतरी जुन्या वाटा आठवायच्या. आताच्या वाटेतल एखाद वळण त्या वाटेला मिळत असेल ह्या विचाराने कायम वळायचा व्यर्थ प्रयत्न करायचा तो. आपले हरवलेले शब्द त्या वळणांमधल्या झाडात कुठेतरी सापडतील अशी त्याला अपेक्षा होती. पण वळण्यासाठीचे सगळे रस्ते अचानक one way झाले होते.
One way मध्ये घुसणं तर नियमबाह्य आणि हा तर काटेकोरपणे नियम पाळणारा. पण मग त्याला त्याचे जुने साथीदार दिसले. त्याच वळणांवर सारखे दिसत होते त्याला. पळता पळता त्याने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. एकच क्षण.. आणि त्याने मुख्य वाट सोडली आणि त्या माणसांबरोबर पळणं पण सोडून दिलं.
आता तो वळला होता. पुन्हा एकदा नियम तोडून one way मध्ये घुसला होता तो. त्याला त्याचं झाड पुन्हा सापडलं होतं. आता तो इथेच बसणार होता... चिरकाल निद्रेसाठी.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

उत्तर

उत्तर


तुझी ना कधी कधी खूप आठवण येते. तू अशी का जातेस ग लांब माझ्यापासून? मला ना खूप गोष्टी बोलायच्या असतात तुझ्याशी.. पण कधी कधी काय बोलू हे कळतच नाही. काय बोलायचं रोज रोज?
खरंतर ना रोज मला तुला एकाच गोष्ट सांगायची असते. पण साला ती गोष्ट अशी बोलता येत नाही. अश्या ना भावना मनात असतात, पण त्यांना तुझ्यासमोर कधीच शब्द सुचत नाहीत. मग पुन्हा तेच होतं. मी पुन्हा दुसर्या दिवशी ठरवतो, नवीन शब्द तयार करतो आणि ते शब्द पुन्हा ऐनवेळी दगा देतात.
आता ना मला तुझ्याशी बोलायची भीती वाटायला लागलीये. माहिती नाही का? पण एक अनामिक भीती बसलीये स्वतःबद्दल. तुझा message आला ना कधीतरी किंवा फोन आला तरी ही भीती माझा पाठलाग करत असते. कधी माझ मन मला दगा देईल आणि ती गोष्ट मी कधी बोलून जाईल मलाच कळेनास झालय. आता असह्य व्हायला लागलाय तुझ्याबरोबर राहणं, बोलणं, भेटणं. कायम ‘ती’च एक गोष्ट मनात.
खरच आपली मैत्री झाली तेव्हा बरा होतो मी. आता काय झालाय मला? का असे सारखे तुझ्याबद्दल विचार येतात? आणि ह्याने आपली मैत्री एक अगदी नवीनच वळण घेईल, हे का कळत नाहीये मला? कोणत ते माहिती नाही.पण त्यानंतर गोष्टी बदलातील नक्कीच. कदाचित तू मला हो म्हणशील कदाचित नाही. पण तू काहीच म्हणाली नाहीस तर? कळत नाहीये काय करू? कोणाला विचारू हे सगळ?
 काहीतरी मी तुझ्या बाजूचा पण विचार करायला लागतो. मग वाटत तुला पण असाच वाटत असेल का माझ्याविषयी? कधीच तुला काहीच वाटलं नसेल का इतके दिवसात? तुला पण कधीतरी सगळ सांगून टाकाव असा वाटलं नसेल? मला ना ह्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत. मला सारखा वाटतय कि फक्त तुझ्याकडे उत्तरं आहेत. पण हे प्रश्न नेमके तुला विचारता पण येत नाहीत. अस्वस्थ मी. आणि तू? माहिती नाही.
तू हि अशी लांब माझ्यापासून. Communication चे सगळे mediums एवढे जवळ. हे physical distance खरंतर नाही separate करत आपल्याला. काय separate करताय मग? का मी रोज तुझ्या फोन ची वाट बघतोय? का तुझ्या त्या एका message ची वाट बघतोय मी? काय झालाय मला? काय बदललंय आपल्यात? बारा झाला तू आत्ता एवढी लांब आहेस माझ्यापासून. गोंधळ चाललाय डोक्यात नुसता. कान बंद केले तरी ऐकू येणारा.
पण एवढ्यात फोन वाजतोय. कोण आहे रे? मी वैतागून फोन हातात घेतो. बघतो तर तूच. Confusion वाढत चाललंय. उचलू? नको उचलू? काय करू? पण मी नाही करू शकत अस तुझ्याबरोबर. मी फोन उचलतो आणि फक्त hello म्हणतो. तिकडून तुझी नुसती बडबड चालू होते. मी आजपण तुझ्याशी काहीच बोलत नाही. पण आता गोंधळ शांत झालाय. फोन ठेवल्यावर पण अस्वस्थ वाटत नाहीये.उत्तरं सापडलाय.
मला काहीच सांगायचं नाहीये तुला... फक्त एक संवाद... आणि हे अंतर... खर नाही.. पण तुला समजलंय.. आणि मलाही